नमस्कार

माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...



त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...







Tuesday, June 07, 2011

बंद काय सांगतो?

शैक्षणिक माध्यमात इंग्रजीचे प्रस्थ वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध भारतीय भाषा सुरक्षा मंचाने काल पुकारलेल्या गोवा बंदला अपेक्षेनुसार जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला. आजवर सक्तीने घडवून आणलेले बंद राज्यात अनेक झाले, परंतु जनतेने दिलेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद हा कालच्या या बंदचा विशेष होता. हा बंद मोडून काढण्यासाठी सरकारने जंग जंग पछाडले. प्रथमच फार मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना पोलिसांद्वारे समन्स पाठवून दडपण आणण्याचा प्रयत्न झाला, प्रतिबंधात्मक अटकेचे शस्त्रही हेतुतः उगारले गेले. परंतु या बंदमध्ये स्वतःहून सामील होण्याचा निर्धार जनतेनेच केलेला असल्याने या सार्याि प्रयत्नांचा पार फज्जा उडाला व भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या अपेक्षेहूनही अधिक यश या बंदला लाभू शकले. शैक्षणिक माध्यमाच्या प्रश्नायवर जनतेमध्ये जो प्रचंड रोष गोव्याच्या खेड्यापाड्यांमध्ये उत्पन्न झालेला आहे, त्याची जाणीव मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना आता तरी होईल अशी आशा आहे. शैक्षणिक माध्यमातून देशी भाषांच्या व पर्यायाने भारतीय संस्कृतीच्या उच्चाटनाचे आत्मघातकी पाऊल श्री. कामत यांनी केवळ सत्तेच्या मोहाने उचलले अशी जनतेची आज भावना बनली आहे. ही नाराजी सरकार, शिक्षणमंत्री यांच्याविषयी जितकी आहे, त्याहून अधिक ती व्यक्तिशः दिगंबर कामत यांच्याविरुद्ध आहे असे जाणवते. हे सत्य त्यांनी नाकारणे म्हणजे स्वतःचीच फसगत करून घेणे ठरेल. गेले काही दिवस सर्व पातळ्यांवर त्याचा प्रत्यय येतो आहे. गेल्या शुक्रवारी चौथ्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आधी प्रहसनात आणि नंतर उद्घाटक विक्रम गोखले यांनी आपल्या भाषणात कामत यांना कानपिचक्या मिळाल्यावर प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दीनानाथ मंगेशकर कलामंदिर ज्या तर्हेोने दणाणून सोडले, त्या जनभावनेकडे दुर्लक्ष करणे मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला त्यांनी कितीही बेफिकिरीचा आव आणला तरी परवडणारे नाही. ‘पालकांची इच्छा’ या तकलादू कारणाचे तुणतुणे वाजवून आम जनतेचा हा रोष दडपता येणार नाही. गोव्याची जनता सुज्ञ आहे व तिला सगळे कावे समजतात याचा प्रत्यय कालच्या कडकडीत बंदने दिलेला आहे. सासष्टीतील मूठभर इंग्रजीधार्जिण्यांच्या दमबाजीपुढे झुकणार्यांाना या गोव्याच्या लक्षावधी नागरिकांनी दिलेला हा जणू इशारा आहे. या बंदच्या यशस्विततेमागे भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या नेत्यांनी तालुकास्तरावर केलेली जनजागृती व काटेकोर नियोजन या दोन गोष्टी तर कारणीभूत आहेतच, परंतु त्याहून अधिक जनतेच्या मनातील सरकारच्या माध्यमविषयक निर्णयाबाबतचा धगधगता असंतोष या बंदला कमालीचा यशस्वी करून गेला आहे. या वास्तवावर कितीही पडदे ओढण्याचा प्रयत्न झाला, तरी जनतेचा हा रोष दडवणे आणि दडपणे कुठल्याही शक्तीला शक्य होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ समजावी. माध्यम प्रश्नी्चे हे आंदोलन भाषांच्या काही भोंदू कैवार्यांचना पार उघडे पाडून गेले. तळ्यात - मळ्यात करणार्यांवचे बुरखेही टराटरा फाटले. दुटप्पी चेहरे उघडे पडले आहेत. जनतेला काही काळ मूर्ख बनवता येते, सदासर्वकाळ नाही हेच खरे ठरले आहे. ‘माध्यम इंग्रजी आणि एक विषय कोकणी सक्तीचा’ हे गाजर दाखवून कोकणी - मराठीप्रेमींमध्ये दुफळी पाडण्याचा प्रयत्नही पुरेपूर झाला, परंतु त्याला कोकणीप्रेमी बधले नाहीत. या दोन्ही भाषांतून येथील संस्कृती फुलली आहे. जशी कोकणी या मातीचा सुवास घेऊन येते, तसाच मराठीचा मोगराही येथे संस्कृती आणि परंपरांचा दरवळ घेऊन येतो. साहित्य, संगीत, कला, लोककलांचा पाया असलेल्या देशी भाषांना दुय्यम स्थान दिल्याने अवनतीखेरीज दुसरे काहीही चांगले घडणे शक्य नाही, हे सत्य सरकारने आता तरी ओळखावे. गोमंतकीय मुलांना इंग्रजी उत्तम आली पाहिजे. त्यासाठी शाळा - शाळांमधून उत्तम इंग्रजी शिक्षक नेमावेत, या भूमीशी संबंधित पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमात लावावीत, जागतिक ज्ञानभांडार या मुलांना खुले करावे, परंतु त्याआधी प्राथमिक शिक्षणात तरी निदान देशी भाषांचा पाया बळकट करून या मुलांना आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांची तोंडओळख घडवावी. कालच्या गोवा बंदने सरकारला दिलेली ही आम जनतेची कळकळीची हाक आहे. हे सत्य त्यांना जेवढे लवकर उमगेल, तेवढे त्यांच्याच हिताचे आहे.

0 आपली प्रतिक्रिया:


राष्ट्रपतींसमवेत गोव्यातील इतर दैनिकांच्या संपादकांसमवेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP